***** आजची वात्रटिका *****
**********************
सच का सामना
लोकांच्या खाजगी जीवनात
नको तेवढे डोकू लागले.
रिऍलिटी शो च्या नावाखाली
नको नको ते विकू लागले.
एखादा क्षणिक विचार
कायमचे सत्य असू शकत नाही !
टि.आर.पी. सारखा प्रेक्षक मात्र
या ’माया’जालात फसू शकत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment