--------------------
राजकीय मुद्द्यांची गोष्ट
काही गोष्टी उघड करून,
काही हातचे राखलेले असते.
कोणता मुद्दा कधी उचलायचा?
याचे वेळापत्रक आखलेले असते.
राजकारणाचा सगळा कार्यक्रमच,
अगदी असा टाईम बॉण्ड असतो.
जेव्हा जसा स्वार्थ असेल,
तसा पॉलिटिकल स्टॅन्ड असतो.
काल सुसंगत आणि काल विसंगत,
मुद्द्यांना बरोबर फिरवले जाते !
त्यांच्या विजयाच्या शक्यतेचे कारण,
मुद्द्यांना मुद्द्यांनी हरवले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8863
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21मार्च2025
No comments:
Post a Comment