आजची वात्रटिका
-------------------
युद्धकालीन सत्य
कोण खरे?कोण खोटे?
युद्धकाळात काही कळत नाही.
अफवा आणि वावड्यांशिवाय,
कानावर काही आदळत नाही.
कधी खरेही खोटे वाटू लागते,
कधी खोटेही खरे वाटू लागते.
पहिल्या अफवा जिरेपर्यंत,
नव्या अफवांना तोंड फुटू लागते.
कळत नाही कुणाची नियत खराब?
कुणाची नियत साफ असते ?
प्रेमात आणि युद्धात,
म्हणूनच तर सगळे माफ असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8916
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14मे 2025

No comments:
Post a Comment