आजची वात्रटिका
--------------------
सामाजिक जागृती
भावनिकतेवर राजकारण होते,
समाजकारण होऊ शकत नाही.
कुणी तसे करायला गेलेच तर,
उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही.
तरीही भावनिक मुद्दे घेऊन,
समाजकारणाचा प्रयत्न केला जातो.
आपलाच डाव मग,
आपल्याच अंगाशी आला जातो.
असल्या सामाजिक कावेबाजांना,
संशयी नजरेने पाहिले पाहिजे !
सामाजिक अनर्थ टाळण्यासाठी,
समाजाने जागृत राहिले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9343
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 जुलै 2026

No comments:
Post a Comment