आजची वात्रटिका
--------------------
खोटारडेपणा
किरकोळ किरकोळ विषयसुद्धा,
आजकाल वादग्रस्त ठरत आहे.
ज्याला संधी मिळेल त्याच्याकडून,
बिनधास्तपणे राईचा पर्वत आहे.
एकदा राईचा पर्वत झाला की,
सुतावरून स्वर्ग गाठणे सोपे जाते.
कितीही बिनबुडाचे असले तरी,
आपलेच म्हणणे रेटणे सोपे जाते.
एकदा आपलेच म्हणणे रेटले की,
आपली रेटारेटी चालू ठेवली जाते!
उठता बसता आपली जीभ,
पुन्हा पुन्हा टाळ्याला लावली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9359
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5ऑगस्ट 2026

No comments:
Post a Comment