आजची वात्रटिका
-------------------------
वाद संवाद
मानवाचे दैवतीकरण चालते,
देव देवतांचे मानवीकरण नाही.
भक्त कुणाचाही असला तरी,
तो सामान्यीकरणास शरण नाही.
कुणी असे काही केले तर,
भक्त मंडळी पेटून उठू लागते.
देव देवतांचे मानवीकरण,
बिचाऱ्या भक्ताला कटू लागते.
काळ पुढे पुढे चालला तरी,
भक्तांना पुराणात रमायला आवडते !
त्यामुळे त्यांची दमछाकक झाली तरी
भक्तांना श्रद्धेपोटी दमायला आवडते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6839
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
19जून2023
No comments:
Post a Comment