आजची वात्रटिका
-------------------
मराठवाडा वॉटर ग्रीड
दुष्काळी मराठवाड्याचा इतिहास,
अतिवृष्टीने बदलून टाकला आहे.
रांगड्या मराठवाड्याचा भूगोलही,
अतिवृष्टीने कुदलून टाकला आहे ?
मराठवाड्याचे कोरडे दुःख,
महापुरात ओले होऊन वाहू लागले.
मराठवाड्यातील कवी लोक,
आता महापुराच्या कविता लिहू लागले.
इथली पोकळ राजकीय इच्छाशक्ती,
आता जणू निसर्गाने जाणली आहे !
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना,
निसर्गानेच प्रत्यक्षात आणली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9049
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment