आजची वात्रटिका
-----------------------
कोर्ट प्लॅन
न्यायालयाचा आदर करावा,
या विचाराशी कधीच फारकत नाही.
निवडणुकांच्या ऐवजी कोर्टातून,
सरकार बसवायला हरकत नाही.
केवळ आम्हालाच नाही तर,
कुणालाही हा प्लॅन सुचू शकतो.
निवडणुकीतल्या पैशाबरोबर,
सर्वांचा किंमती वेळही वाचू शकतो.
त्यासाठी सरकार बनवण्याचा दावा,
दर पाच वर्षांनी ठोकला पाहिजे !
घटनाबाह्य सरकार स्थापण्याचा,
असा कोर्ट प्लॅन आखला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6722
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
17फेब्रुवारी2023

No comments:
Post a Comment