आजची वात्रटिका
------------------------
कवींचे गट
जे मंचावर गळे काढतात,
ते मंचीय कवी असतात.
व्वा क्या बात है वाले,
पक्के पंचीय कवी असतात.
कविता डोक्यावरून जाते,
ते उंचीय कवी असतात.
ज्यांची कविता मादक आणि टंच,
ते तर टंचीय कवी असतात.
ज्यांचा असतो कळप,
ते सर्व संचीय कवी असतात!
बियर आणि चिअर वाले,
ते बंचीय कवी असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6709
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
3फेब्रुवारी2023

No comments:
Post a Comment