आजची वात्रटिका
-------------------
जो गरजवंत असेल त्याचा,
वापर करून घेतला जातो.
आपल्या राजकीय पुनर्वासनाचा,
राजकीय घाट घातला जातो.
आंदोलन,संप आणि मोर्चे,
संविधानिक मार्ग निवडले जातात.
राजकीय पुनर्वसनाचे प्रयोग,
मीडियाला सुद्धा आवडले जातात.
गरजवंतांच्या गरजा आणि प्रश्न,
जसे आहे तसेच राहून जातात !
संविधानिक मार्गानेच मग,
राजकीय पुनर्वसनं होऊन जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9079
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
31ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment