आजची वात्रटिका
----------------------------
मार्ग आडमार्ग
कधी भक्तीने लढवल्या जातात,
कधी शक्तीने लढवल्या जातात,
भक्ती आणि शक्ती पेक्षा जास्त,
निवडणुका युक्तीने लढवल्या जातात.
भक्ती,शक्ती आणि युक्तीचा,
जेव्हा त्रिवेणी संगम साधला जातो.
तेव्हा मैत्रीपूर्ण लढती ऐवजी,
बिनविरोधचा मार्ग शोधला जातो.
निवडणुकीत कधी काय चालेल?
याचा कधी अंदाज लावता येत नाही !
त्याने निवडणूकच लढवू नये,
ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9072
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment