आजची वात्रटिका
-------------------------
बदलते राजकारण
कालचे प्यादे आणि वजीर,
आजचे चक्क राजे झाले.
बदलत्या राजकारणात,
कालचे उंचच खुजे झाले.
बदलत्या राजकारणाची,
हीच बदलती दिशा आहे.
म्हणूनच तर राजकारण,
वाढत जाणारी नशा आहे.
वजीर आणि राजांची,
सगळीकडून नाकाबंदी आहे !
बदलते राजकारण म्हणजे,
प्याद्यांसाठी संधी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8363
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23सप्टेंबर2023
No comments:
Post a Comment