आजची वात्रटिका
-------------------------
कालचा गोंधळ बरा होता
महाभारत असो वा भारत,
गृहकलह टळलेला नाही.
सगळा मामला कळूनही,
उपाय काही वळलेला नाही.
कधी लवकर;कधी उशिरा,
महाभारत तर रंगले जाते.
तेव्हा नक्की उडतो भडका,
जेव्हा कधी स्वप्न भंगले जाते.
मग गाढवापुढे वाचली गीता,
असेच काहीसे घडले जाते !
कृष्णालाही आपले कृष्णपण,
पुन्हा पुन्हा नडले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8296
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6जुलै जून2023
No comments:
Post a Comment