Sunday, February 23, 2020

टाळीचे वाक्य

आजची वात्रटिका
----------------------------------------
टाळीचे वाक्य
समाजकारण हा विषय
बोलण्यापूरताच उरला आहे.
सत्ताकारण हा एकच अजेंडा,
राजकारणात मुरला आहे.
राजकारणातून समाजकारण,
हे फक्त टाळीचे वाक्य आहे !
सत्ताकांक्षा वाढल्याने वाटत नाही,
यापुढे ते कुणाला शक्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5725
दैनिक पुण्यनगरी
23फेब्रुवारी 2020

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...