Sunday, February 23, 2020

टाळीचे वाक्य

आजची वात्रटिका
----------------------------------------
टाळीचे वाक्य
समाजकारण हा विषय
बोलण्यापूरताच उरला आहे.
सत्ताकारण हा एकच अजेंडा,
राजकारणात मुरला आहे.
राजकारणातून समाजकारण,
हे फक्त टाळीचे वाक्य आहे !
सत्ताकांक्षा वाढल्याने वाटत नाही,
यापुढे ते कुणाला शक्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5725
दैनिक पुण्यनगरी
23फेब्रुवारी 2020

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...