आजची वात्रटिका
------------------------
छापील सत्य
साहित्य संमेलनाला,
नेहमीच वादाची बाधा असते.
संमेलनावर राजकारण,
नेहमीप्रमाणेच फिदा असते.
साहित्य आणि राजकारण,
एकमेकांना पूरक आहे.
याला गाळा, त्याला टाळा,
याचे राजकारण कारक आहे.
साहित्यापेक्षा राजकारण,
हेच आमंत्रणाचे मोजमाप असते!
कोणत्या न कोणत्या पक्षाचे,
साहित्य संमेलनावर छाप असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6340
दैनिक पुण्यनगरी
3डिसेंबर2021
No comments:
Post a Comment