आजची वात्रटिका
----------------------------
लोक वर्तन
एकदा पद आले की,
त्याच्या पाठोपाठ प्रतिष्ठा येते.
चेले आणि झेले येतात,
त्यांच्या पाठोपाठ निष्ठा येते.
वाल्याचा होतो वाल्मिकी,
झाले गेले विसरू लागतात!
काल टिंगल-टवाळी होती,
आज पदर पसरू लागतात.
बदललेले लोकवर्तन,
हा मुद्दा जरी वादाचा असतो!
हा सगळा प्रभाव मात्र,
प्रतिष्ठा आणि पदाचा असतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7853
दैनिक झुंजार नेता
25फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment