आजची वात्रटिका
-----------------------
जेव्हा कधी बदलते सत्ता केंद्र,
तेव्हा राजकीय कावे बदलले जातात.
चालू असलेल्या सरकारी योजनाची ,
टप्प्या टप्प्याने नावे बदलले जातात.
नामांतर आणि नाम विस्ताराचे,
कारणसुद्धा बरेच सबळ असते.
कितीही थापा मारल्या तरी,
ती वैचारिक द्वेषाची उबळ असते.
नामांतर आणि नाम विस्तारावरती,
सत्ताधाऱ्यांची वैचारिक छाया असते !
आलटून पालटून का होईना,
त्यांच्या वैचारिक दारिद्र्याची दया असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9126
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17 डिसेंबर2025

No comments:
Post a Comment