आजची वात्रटिका
-----------------------
जे कुणी विजयी झाले त्यांना,
विजयाचे मंथन करावे लागते.
जे कुणी पराभूत आहेत,
त्यांना आत्मचिंतन करावे लागते.
जे कुणी होतात विजयी,
त्यांची यंत्रणा सुपर असते.
कुणाच्या ना कुणाच्या माथी,
पराभूतांकडून खापर असते.
पराभूत कुणीही असला तरी,
आपल्या स्वतःला वाचवले जाते !
दुसऱ्याच्या माथी खापर कडून,
पराभवाचे शल्य पचवले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9163
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16जानेवारी 2026

No comments:
Post a Comment