आजची वात्रिका
-----------------------------
लोकशाहीचा आत्मा
खरे तर निवडणुका म्हणजे,
लोकशाहीचा आत्मा असतो.
पण प्रत्येक निवडणुकीत मात्र,
लोकशाहीचा खात्मा असतो.
आपल्या लोकशाहीचा खात्मा,
आपल्याच डोळ्यादेखत असतो.
शाईचे बोट तोंडात घालून,
आपण आश्चर्याने ते चोखत असतो.
लोकशाहीचा खात्मा होतो,
सगळ्यांचा आत्मा शांत होतो !
स्वतःला श्रद्धांजली वाहिल्यावरच,
आपल्या सहनशीलतेचा अंत होतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6500
दैनिक पुण्यनगरी
12जून 2022
No comments:
Post a Comment