आजची वात्रटिका
---------------------
सत्तांतर आणि नामांतर
पहिले सरकार गेले की,
दुसरे सरकार येते असते
लोकांच्या लेखी फक्त,
सरकारचे नामांतर होत असते.
किती आले?किती गेले?
लोक आहेत तिथेच असतात.
सरकारं बदलली तरी,
मंत्री मात्र आहेत तेच असतात.
कालच्यात आणि आजच्यात,
तसे फारसे कुठे अंतर असते ?
त्यामुळे सत्तांतर झाले तरी,
दुर्दैवाने तेही एक नामांतर असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6516
दैनिक पुण्यनगरी
30जून 2022
No comments:
Post a Comment