साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------
मोर्चाचे पीक
जणू शेतकऱ्यांच्या हितावरती,
सगळ्यांचेच राजकीय जीव आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोर्चे,
सदा सर्वकाल चिरंजीव आहेत.
मोर्चे कायम; समस्या कायम,
हा प्रकार आश्चर्यकारक असतो.
झेंडे,नेते आणि घोषणा,
यांच्यामध्ये दरवेळी फरक असतो.
शक्ती,भक्ती,शक्ती आणि युक्तीने,
शेतकऱ्यांना मोर्चात ओढले जाते !
शेतकऱ्यांच्या बळावरती,
मोर्चांचे नवे नवे पीक काढले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 77
वर्ष- दुसरे
7 मार्च 2026
No comments:
Post a Comment