आजची वात्रटिका
-------------------
आखून ठेवलेल्या डावाचे,
जेव्हा खेळखंडोबा होऊ लागतात.
तेव्हा निवडणूक काळामध्ये,
सर्वत्र बंडोबा जन्म घेऊ लागतात.
अन्याय,अपमान आणि नाराजी,
निवडणूक काळात ठळक होते.
ज्याची त्याला स्वतःची स्वतःलाच,
निवडणूक काळातच ओळख होते.
एकदा निवडणूक संपली की,
नाराजीही गुंडाळून ठेवली जाते !
निष्ठावंतांची जुनी शाल पांघरून,
सुरक्षित जागा धुंडाळून ठेवली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9098
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19 नोव्हेंबर2025

No comments:
Post a Comment